Sakshi Sunil Jadhav
यंदा चैत्र नवरात्रीला १९ मार्च मार्च २०२६ रोजी सुरूवात होणार आहे. या नऊ दिवसांच्या उत्सवाची तयारी घरोघरी सुरू झाली आहे.
चैत्र नवरात्रीला चविष्ट पदार्थांपासून ते मिठाईपर्यंत, उपवासासाठी सर्व काही तयार केलं जातं. त्यामध्ये नेहमीच गोडासाठी काय बनवायचं? हा प्रश्न अनेकांना पडतो.
बराचवेळ पोट भरलेले राहण्यासाठी आणि उपवासाच्या दिवसांमध्ये येणारा अशक्तपणा कमी करण्यासाठी गोड पदार्थ आवश्यक असतात. त्यामुळे घरी खास मिठाई बनवली जाते.
पुढे आपण नारळ आणि शेंगदाण्यांपासून बनवलेल्या बर्फीची रेसिपी सांगणार जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्हाला बाजारातून मावा विकत आणण्याची गरज लागणार नाही.
फायबर आणि चांगले फॅट्स भरपूर प्रमाणात असल्यामुळे दिवसभर शरीरात पाण्याची पातळी टिकून राहते. याचे वैशिष्ट्य म्हणजे यात मावा, साखरेचा पाक किंवा इतर कोणतेही विशेष घटक वापरले जात नाहीत.
१ वाटी भाजलेले शेंगदाणे, १ वाटी किसलेले सुके खोबरे, १ ग्लास दूध, ४ वाटी साखर, थोडे काजू आणि बदाम, वेलची पूड, १ छोटा चमचा तूप इ.
सर्वप्रथम, शेंगदाणे भाजून त्याची जाडसर पूड करा. त्यात खोबरे आणि वेलची घालून बाजूला ठेवा. आता, मिक्सरमध्ये दूध, साखर आणि सुका मेवा घालून घट्ट पेस्ट बनवा.
एका पातेल्यात थोडं तूप गरम करा, त्यात शेंगदाणा-नारळाचे मिश्रण घालून हलके परतून घ्या. नंतर, तयार केलेली दुधाची पेस्ट घालून सतत ढवळत राहा. काही मिनिटांतच मिश्रण घट्ट होईल आणि पातेल्याला चिकटणं बंद होईल.
आता ते तेल लावलेल्या ताटावर पसरवा आणि सेट होऊ द्या. थंड झाल्यावर, त्याचे तुकडे करा आणि सर्व्ह करा.